बुलढाणा न्यूज

जगातील एक महान व्यक्ती – डॉ.आंबेडकर

        1913 मध्ये रामजी लष्करी सेवेतून निवृत्त झाले. त्यानंतर ते दापोलीस आले. भिमराव तेथील शाळेत जाऊ लागला. पण मुळात भिमाचा स्वभाव खोडकर असल्यामुळे त्यांची भांडणे मिटवणे दिवसेंदिवस रामजीला जड जाऊ लागले. त्यामुळे ते सातार्‍यास राहावयास आले. त्याचा खोडकर स्वभाव जावा म्हणून त्याचे नाव कॅम्प हायस्कुलमध्ये दाखल केले. सातार्‍याचे वास्तव्य भीमाबाईला लाभदायक नव्हते. त्यामुळे त्यांची तब्येत वारंवार बिघडून जात असे, अशातच त्यांनी कायमचे अंथरुण-धरले आणि त्या मृत्यू पावल्या. त्यावेळी भिमराव अवघे सहा वर्षाचे होते.

          भीमाच्या शिक्षणासाठी रामजींनी अतोनात कष्ट घेण्याचे ठरविले होते. आपल्या मुलाला प्रखर बुध्दीमत्तेची दैवी देणगी लाभली असल्याचे ओळखून भीमाच्या हिंदु समाजातील एका अडाणी व क्रुर रुढीमुळे त्याकाळी अस्पृश्य गणल्या जाणार्‍या जातीत जन्मल्यामुळे काही जणांकडुन क्षणोक्षणी अपमान होऊ लागला. पण त्यातही त्यांच्यावर प्रेम करणार्‍या केळुसकर गुरुजींच्या प्रोत्साहनामुळे व मार्गदर्शनामुळे भिम उत्तम तर्‍हेने मॅट्रीकची परीक्षा 1907 साली पास झाला, चाळीतील लोकांनी मोठा थाटात सत्कार केला. रामजी पुढे मुलांच्या शिक्षणासाठी मुंबईस आले. भीमाने मुंबई सारख्या एल्फिन्स्टन कॉलेज मध्ये प्रवेश केला. जातीने अस्पृश्य असल्याने भिमाला इच्छा असूनही संस्कृतचा अभ्यास करता आला नाही. पार्शियन भाषेत मात्र त्याचा पहिला नंबर असे. आनंदाची अभ्यासातील प्रगती बेताचीच असल्याने त्यास नोकरीला लावले, नंतर आनंद व भीमाचे लग्न केले. लग्नाच्या वेळी भीमा 14 वर्षाचा रमा 9 वर्षाची होती.

         बडोदे सरकारची शिष्यवृती मिळवून एल्फिन्स्टन कॉलेजात प्रवेश घेतला. कॉलेजात शिक्षण देखील भीमा महार असल्यामुळे त्याला योग्य मार्गदर्शन व मदत मिळाली नाही. तरीही तशाच परिस्थितीत भीमराव एल्फिन्स्टन कॉलेज मधुन 1912 साली बी.ए. झाले. बडोद्याच्या महाराजांच्या ऋणातून अल्पसे मुक्त होण्यासाठी त्यांनी त्यांचेकडे नोकरीचा अर्ज केला त्यांना सयाजीराव गायकवाडांच्या कडे नोकरी मिळाली. परंतु वडिल आजारी असल्याची तार मिळताच डॉ. आंबेडकर मुंबईस निघाले. सुरत स्टेशनवर वडिलांसाठी बर्फी घ्यावी म्हणून ते उतरले असताना गाडी निघून गेली. त्यामुळे घरी पोहोचण्यास त्यांना उशीर झाला. वडिलांचे डोळे मुलाला पाहण्यासाठी आतूर झाले होते. मुलगा आल्याचे कळताच त्यांनी डोळे उघडले. आपल्या लाडक्या मुलाच्या अंगावरुन प्रेमाने हात फिरविला आणि त्या महान पुरुषाने हया जगाचा शेवटचा निरोप घेतला. बडोद्याच्या प्रागतिक राजे सयाजीराव साहेबांनी शिष्यवृत्ती देऊन त्यांना अमेरिकेत पाठविले. आपण केवळ शिक्षणासाठी अमेरिकेत आलो आहोत याची जाणीव भीमरावांना होती. एखाद्या तपस्व्या प्रमाणे त्यांनी उपासना केली. ते अभ्यासात दिवसाचे अठरा तास घालवू लागले. 1915 साली ते एम.ए. झाले. त्यानंतर त्यांनी निरनिराळया विषयांवर दोन-तीन प्रबंध लिहिले. हया कष्टांचे फळ म्हणून 1924 साली कोलंबिया विद्यापीठाने त्यांना डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ही पदवी दिली. सरकारी कचेरीत त्यांना मोठया हुद्याची जागा देण्याऐवजी केवळ 225 रुपयांवर खर्डेघाशी करावी लागू लागली. हाताखालचे लोक देखील त्यांना पाणी देत नसत व त्यांच्या टेबलावर दुरुन फाईल टाकत. भीमरावांना मिळत असलेली ही वागणूक पसंत नव्हती. त्यांचा स्वाभिमान दुखावला गेला म्हणून ते मुंबईला परतले.

        एवढे झाले तरीही त्यांनी धीर खचू दिला नाही, थोडीशी खटपट करुन त्यांनी सिडेनहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापकाची जागा मिळवली, पैसा जमवला व 1920 साली ते अपुर्ण अभ्यास करण्यासाठी पुन्हा एकदा लंडनला रवाना झाले. तिथे ते सकाळी आठ ते संध्याकाळी पाचपर्यंत निरनिराळया ग्रंथालयात पुस्तके वाचीत आणि रात्री दहानंतर दिवस उजाडेपर्यंत त्यांचा अभ्यास चालू असे, त्याचे फळ 1923 मध्ये लंडन विद्यापीठाने त्यांना दिलेली डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी होय. बहिष्कृत वर्गावर वर्षानुवर्षे जो अन्याय होत आलेला आहे तो वेशीवर टांगून त्याचे निराकरण झाले पाहिजे ही त्यांची मागणी होती. बहिष्कृतांचा हा लढा लढतांना त्यांनी नेहमी विधायक आणि व्यापक भूमीका घेतली आणि अस्पृश्य समाजाला स्वत:हुन काही करावेसे वाटावे या दृष्टीने त्यांच्यात चैतन्य निर्माण करायचे अशा दृष्टीने त्यांनी आपल्या कार्याची पाऊले पुढे टाकण्यास सुरुवात केली. त्यापैकी पहिली सुरुवात म्हणजे 1940 साली त्यांनी सुरु केलेले पाक्षिक मुकनायक हे होय.

         त्यानंतर त्यांनी महाडच्या तळयातील सर्वांसाठी म्हणजेच अस्पृश्यांना पाणी मिळत नव्हते. पाणी म्हणजे जीवन, तेच त्यांच्यापासून हिरावून घेतले यासाठी सत्याग्रह करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. मार्च 1927 रोजी सत्याग्रही तळयाकडे निघाले. माणुसकीचे हक्क व निसर्गाची देणगी जे पाणी, ते मिळवायचेच एवढयासाठी चालेले होते. डॉ. आंबेडकर सर्वांच्या पुढे होते. अस्पृश्य म्हणून मुंबईच्या कॉलेजात ज्यांनी पाण्याचे हाल सोसले. सर्वजण तळयाजवळ येऊन पोहोचले, प्रथमत: त्यांनी पाण्याचा घोट घेऊन इतरांना पाणी पिण्याची मोकळीक दिली.

           डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन म्हणजे भारतीय जनतेच्या समतेच्या लढयाची अविस्मररणीय गाथा होय. दलितोत्ध्दारक, धर्मसुधारक, प्रकांडपंडीत, समाजशास्त्रज्ञ व संविधानाचे शिल्पकार असे विविध पैलू त्यांच्या जीवनाशी निगडीत आहेत. अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा विचार करता, तत्कालीन सामाजिक, राजकिय प्रश्नांना ते कसे सामोरे गेलेत या प्रश्ना प्रमाणेच राष्ट्रीय एकात्मतेचा विचार ही त्यांनी केला. या सर्व बाबींचा मागोवा घेणे अभ्यासाचा विषय आहे. तेव्हा आपला समाज एक संघ असला पाहिजे, यावर त्यांचा अधिक भर होता.
नाशिकच्या काळाराम मंदिरात प्रवेश मिळवण्यासाठी 5 वर्षे सतत झगडत राहिले शेवटी 1935 मध्ये नाशिकचे काळाराम मंदिर अस्पृश्यांसाठी खुले करण्यात आले. त्याचवेळी बौध्द धर्म स्विकारणार अशी घोषणा त्यांनी येवले (नाशिक) या ठिकाणी केली. त्या दरम्यान बहिष्कृत भारत नावाचे नियतकालिक सुरु केले. आपल्या भारत देशात इंग्रजांचे राज्य होते नंतर 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र्य झाला. भारतातल्या लोकांना विशिष्ट पध्दतीने राज्यकारभार करता यावा यासाठी भारताची स्वतंत्र्य राज्यघटना असणे आवश्यक झाले. त्या दृष्टीने भारतीय विद्वानांची एक घटना (तज्ञ) समिती नियुक्त करण्यात आली. त्यात बॅरी. तेजपाल सप्रु, बॅरी. जयकर आणि बॅरि. आंबेडकर हे होते. परंतु उर्वरित दोन तज्ञांनी नकार दिल्यामुळे पं. जवाहरलाल नेहरुंनी ही जबाबदारी बॅरी. आंबेडकर यांच्यावर सोपविली, ती त्यांनी स्विकृत केली. एवढा मोठा कायदेतज्ञ असलेल्या या महात्म्याचे पूर्वजीवन मात्र अत्यंत वाईट गेले असतांना बेदरकारपणे आगपाखड करता आली असती, पण ती सुध्दा त्यांनी केली नाही. अशावेळी देखील बहिष्कृतांच्या चळवळीला वर्ग लढयाचे स्वरुप येणे सहज शक्य होते, त्यातून भारतीय एकसंघतेला तडा जाऊन धर्माच्या नांवावर या देशाची शकले झाली. तशी परिस्थिती उद्भवली असती परंतू भारतीय हा त्यांचा स्थायीभाव होता. भारतीय समाजात त्यांना बदल हवा होता पण त्यासाठी समाजप्रबोधन हाच मार्ग होय, अशी त्यांची दृढनिष्ठा होती. त्यामुळेच राष्ट्रनिष्ठा त्यांनी कधी सोडली नाही. राष्ट्रीय एकात्मतेचा विचार त्यांनी सर्वात महत्वाचा मानला.

          स्वत: बरोबर इतरांचा विचार करुन त्यांनी राष्ट्रनिष्ठे पुढे इतर निष्ठा गौण मानल्या. आपण सर्व भारतीय आहोत ही भावना रुजविणे व वाढविणे महत्वाचे आहे. या निष्ठेला कोणतीही निष्ठा स्पर्धा करु शकत नाही. संकुचित जातीय, धार्मीक किंवा राजकिय व अन्य स्वार्थासाठी त्यांनी राष्ट्रनिष्ठा सोडली नाही. त्यांची ही भावना स्वातंत्र्योत्तर काळात सत्तेत सहभागी होतांना, कायदामंत्री असतांना रिपब्लीकन पक्ष काढतांना, धर्मांतराची घोषणा करतांना अशा महत्वाच्या जीवनप्रसंगी सतत जागी राहिल्याचे दिसेल. त्यामुळे खर्‍या अर्थाने त्यांना राष्ट्रपुरुष संबोधले पाहिजे. खरोखरच डॉ. आंबेडकरांना वगळून हा देश मोठा झाला असता काय ? याचा गंभीरपणे विचार करणे गरजेचे आहे. डॉ. आंबेडकरांची कायदामंत्री म्हणून निवड करण्यात आली. त्यांनी अहोरात्र कष्ट करुन मोठया कष्टाने आपल्या अंगी असलेली सगळी बुध्दिमत्ता प्राणपणाला लावून 2 वर्षे 11 महिने 17 दिवसात घटना लिहून पुर्ण केली. त्यामुळे त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून संबोधले गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर जेवढी जबाबदारी होती तेवढी जबाबदारी जगातील कोणत्याही पुरुषावर नव्हती. ते जर अजुन जगले असते तर कदाचित त्यांच्या मनासारखे निश्चित घडले असते, हे कोणीही नाकारु शकत नाही.

               पिकते तेथे विकत नाही हा सिध्दांत माहित आहे, तेव्हा आपल्याजवळ असलेल्या माणसाचे गुण आपण ओळखु शकत नाही. दूसर्‍या माणसाला त्याची पारख होते हे सर्वविदित आहे. म्हणूनच 1 जून 1952 रोजी अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर ऑफ लॉ ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला. डॉ. आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता या लोकशाही तत्त्वांचा पुरस्कार करणारे अनेक ग्रंथ लिहिले, भाषणे दिली आणि आपली दलिताबद्दलची भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या प्रेरणेने शाळा, प्र-शाळा तर निघाल्याच पण उच्च शिक्षण देणारी महाविद्यालयेही निघाली. शिक्षण, समाजकल्याण, अर्थकरण, राजकरण या सर्वामध्ये त्यांनी आपले स्वतंत्र, तर्कशुध्द विचार मांडून दाखविले. दलित समाजात जागृती होत गेली तेव्हा त्यांना ज्ञानाचे महत्व पटले. अनेक दलित आज समाजात विचारवंत म्हणून मान्यता पावले आहेत, त्यामागे डॉ. बाबासाहेबांची प्रेरणा आहे. समाजाने त्यांच्या विषयीचा आदर अनेक प्रकारे व्यक्त केला आहे. आज त्यांचे नाव दिलेली कितीतरी विद्यालये, महाविद्यालय, विद्यापीठे कार्यरत आहेत.

          महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 सालची पहाट, अतिशय मंगल पहाट होती ती, सुर्यचंद्र इत्यादी ग्रहांचा पवित्र मिलाप झाल्याचा तो दिवस होता. शिवाय तो दिवस भाग्याचा व पुण्यांचा समजला गेला होता. त्याचवेळी भिमाबाईला मध्य भारतातील महू या ठिकाणी पुत्ररत्न लाभले. बाराव्या दिवशी मुलाचे भीमराव असे नाव ठेवण्यात आले. त्यांचा हिंदु धर्मातील पाखंडी संताना विरोध होता. भारत देशावर मात्र त्यांचे अलोट प्रेम होते. त्यामुळे हिंदु धर्मातून परधर्मात जाण्याचा विचार करतानाही भारतातच उगम पावलेल्या बौध्द धर्म याची नागपूर शहरात आपल्या लाखो अनुयायासह 14 ऑक्टोंबर, 1956 रोजी बौध्द धम्माची दीक्षा घेतली. आपण जो धम्म घेतला तो उत्तमरीतीने पाळण्याचा निर्धार केला पाहिजे, नाहीतर महार लोकांनी तो निंदाजनक स्थितीत आणला असे होऊ नये म्हणून आपण दृढनिश्चय केला पाहिजे हे आपल्याला साधेल तर आपण आपल्याबरोबर देशाचा इतकेच काय तर जगाचाही उध्दार करु. कारण या धर्माचे लोन जागतीक पातळीवर उंचावत आहे.
आयुष्यभर अनेक गोष्टींशी त्यांना झगडा करावा लागला. अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. पैशांची अडचण असताना त्यातून मार्ग शोधावे लागले. त्यासाठी त्यांनी अतोनात कष्ट सोसले, उन्हातान्हाची पर्वा केली नाही. साहजिकच त्यांची प्रकृती खालवली आणि शेवटी 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. देशाच्या भारतरत्न हा सर्वोच्य पुरस्कार भारत सरकारने त्यांना मरणोपरांत बहाल केला अशा या थोर महापुरुषाच्या 67 व्या महापरिनिर्वाणदिनी पुण्यस्मरण !

प्रविण बागडे
नागपूर
भ्रमणध्वनी – 9923620919
ई-मेल pravinbagde@gmail.com

Leave a Comment

और पढ़ें