युध्दाला खूप खर्च येतो, ऑपरेशन हे लढाईच्या तुलनेत कमी खर्चात होते – कर्नल सुहास जतकर

War costs a lot, operations cost less than battles – Colonel Suhas Jatkar

ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने बुलढाण्यात संवाद कार्यक्रम
लढाईने कोणताही देश प्रगतीच्या दृष्टीने दहा वर्ष मागे येतो

बुलढाणा न्यूज टिम
युद्ध निर्णायक असते तर ऑपरेशन हे फक्त एखादे लक्ष देऊन त्यावर करायचे असते. युध्दाला खूप खर्च येतो. ऑपरेशन हे लढाईच्या तुलनेत कमी खर्चात होते. लढाईने कोणताही देश प्रगतीच्या दृष्टीने दहा वर्ष मागे येतो. लढाईची करायची की नाही हे निवडून आलेले तत्कालीन सरकार ठरवते. म्हणजेच ते निर्णय राजकीय असतात. राजकारण्यांनी निर्णय घ्यायचे आणि सैन्याने ही लढाई लढाईची. यासाठी प्रत्येक देशाकडे त्यांचे सैन्य सल्लागार असतात सर्व जगाची परिस्थिती पाहून ते निर्णय घेतल्या जातात. या संवाद कार्यक्रमात कर्नल सुहास जतकर Colonel Suhas Jatkar यांनी युद्ध व ऑपरेशन या दोन्ही मधील मुख्यत्वे काय फरक असतो हे स्पष्ट करून याबाबतीची विशेष माहिती या संवादात दिली. कर्नल सुहास जतकर यांच्याशी कॅप्टन मोहन कुलकर्णी यांनी संवाद साधत ऑपरेशन सिंदूर विषयी About Operation Sindoor अनेक बाबतींचा उलगडा त्यांच्याकडून करून घेतला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गर्दे वाचनालयाचे अध्यक्ष गोकुळ शर्मा हे होते.

पुढे बोलताना कर्नल सुहास जतकर Colonel Suhas Jatkar यांनी सांगितले की, प्रत्येक देशाच्या शेजारी कोण आहे. कोणत्या त्या देशाच्या बाजूने आहे. त्यांची भौगोलिक परिस्थिती कशी आहे. त्यांची आर्थिक बाजू काय आहे. या सर्व बाबींचा विचार करून युद्धाचा निर्णय घ्यायचा असतो. तो देश युद्ध सहन करू शकतो की नाही. हा राजकीय निर्णय असतो पण युद्ध हे सैनिकांनीच लढायचे असते. पाकिस्तान सातत्याने आतंकवादी भारतावर हल्ले करत आहे. पाकिस्तानने एप्रिल महिन्यात पहेलगाम येथे केलेला आतंकवादी हल्ला हा सर्व सामान्य नागरिकांवर केला. याला प्रत्युत्तर देण्यासाठीच ऑपरेशन सिंदूर करण्यात आले. ऑपरेशन सिंदूर करत असतांना पाकिस्तानातील सर्व सामान्य नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही. याची काळजी भारताच्या सैन्याने घेतली आणि त्याची पुरावे देखील भारताने जगापुढे मांडले. भारताने या सगळ्या गोष्टीचे फोटोग्राफ्स जगापुढे मांडले आहे. याची प्रणाली म्हणजेच भारताने अवकाशात लावलेले सॅटॅलाइट की जे भारताच्या मालकीच्या आहेत आणि त्या सर्व सॅटेलाईटच्या माध्यमातून ऑपरेशन सिंदूरचे सर्व पुरावे भारताकडे उपलब्ध आहेत. आपल्या देशाचे सैनिक हे सीमेवर लढत असतांनाच त्याच्या सर्व भारतीयांनी आदर केला पाहिजे. ते सीमेवर आहेत म्हणूनच सर्वसामान्य नागरिकांना देशात सुरक्षित राहता येते. २०१४ पासून भारत हा आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत असून भारतातच आता युद्ध विमाने , युद्ध नौका तयार होत आहे.आता तर आत्मनिर्भर्तेच्या पलीकडे जाऊन दुसर्या देशांना युद्ध सामग्री विक्री करत आहे. भारत आता युद्धाच्या बाबतीत एक सुसज्ज आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने पुढारलेला स्वयंपूर्ण देश म्हणून जगात ओळखला जातो. ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने बुलढाण्यातील गर्दे वाचनालयाच्या वतीने कर्नल सुहास जतकर यांच्या संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी व्यासपीठावर नाना कुळकर्णी, महेश पेंडके, ओमसिंग राजपूत, गर्दे वाचनालयाचे सचिव उदय देशपांडे, डॉ.सुभाष जोशी,विनायक वरणगांवकर यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाच्या निमित्ताने सैन्यातील सेवानिवृत्त अधिकारी व सैनिकांचा सन्मान देखील गर्दे वाचनालयाच्यावतीने करण्यात आला या संवाद कार्यक्रमासाठी बुलढाणा शहरातील सुजाण नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कुलकर्णी Hosted by Sanjay Kulkarni यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. प्रविण पिंपरकर,रविंद्र जाधव,संजय काळे, रविंद्र कुळकर्णी,आशुतोष वाईकर,मंदार बाहेकर, अरविंद होंडे, ,ग्रंथपाल नेमिनाथ सातपुते श्रीकांत कुळकर्णी, सचिन बल्लाळ,अनिल पालकर, कुंदना हिंगे, देवीदास राजगुरे यांच्यासह गर्दे वाचनालयाच्या सदस्यांनी पुढाकार घेतला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें