अहिल्यादेवी न्यायप्रिय व्यक्ती होत्या – आमदार मनोज कायंदे
Ahilya Devi was a justice-loving person – MLA Manoj Kayande
जवळखेड येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन
देऊळगाव राजा
अहिल्यादेवी न्यायप्रिय व्यक्ती होत्या. त्यांच्या राज्यात नियमानुसार चालणार्या न्यायालयांची सुरुवात झाली. त्यांनी अनेक न्यायालयांची निर्मीती केली व न्यायधिशांची नियुक्ती केली. त्यामुळे, लोकांना सहज न्याय मिळू लागला. सर्व गावात पंचायत मंडळे स्थापन करुन न्यायाच्या कामाला गती देण्यात आली. पंचायत व न्यायालय यांच्या सर्व न्याय-निवाड्याचे विवरणपत्र राज्यातील उच्च अधिकारी व अहिल्यादेवी यांच्याकडे जात असे. पंचायत व न्यायालयात ज्यांचे समाधान होत नसे असे लोक अहिल्यादेवी यांच्याकडे न्याय मागत असत अहिल्यादेवी यांची योग्य न्याय देण्याची किर्ती सगळीकडे पसरली होती. त्यांच्या राज्यात चोख न्यायव्यवस्था अस्तित्वात होती. तसेच भारताच्या नागरिकांना योग्य, सहज व जलद न्याय देण्याचे काम देखील त्यांनी केले असल्याचे आमदार मनोज कायंदे यांनी यावेळी सांगितले. जवळखेड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या सुशोभीकरणासाठी जे जे शक्य होईल तेथे करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे देखील यावेळी आमदार मनोज कायंदे यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजानी मराठी राज्याची पायाभरणी केली. त्या नंतर अनेक लोकांनी हे महाराजांचं राज्य उपभोगलं. मात्र ते टिकविण्यासाठी प्राण पणाला लावले. त्याचे नाव म्हणजे महाराज यशवंत होळकर आहे. याच होळकरांनी शेवटपर्यंत इंग्रजांसोबत लढण्याचं काम केले असल्याचे प्रतिपादन आमदार सिद्धार्थ खरात यांनी जवळखेड येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना सांगितले.जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शशिकला गाटोळे, आमदार मनोज कायंदे माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर, फुले-शाहू-आझाद विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रामप्रसाद शेळके, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुनील कायंदे, युवानेते योगेश जाधव,गंगाधर भाऊ जाधव,दीपक बोरकर गणेश बुरुकुल, गजानन पवार, अनिल चित्ते, तोताराम नागरे सुनील मतकर,तुळशीराम पंडित डॉ उमेश मुंडे, मानसिंग राजे जाधव , प्रभाकर सोरमारे राजू गाटोळे, दिनकर गाटोळे, विजय गाटोळे, यांच्यासह अन्य मान्यवर मंडळी उपस्थित होती.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विकासासाठी कायम कटिबद्ध- डॉक्टर शशिकांत खेडेकर
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जगभरात अनेक ठिकाणी घाट मंदिरे बांधली व अनेक मंदिराचा जिर्णोद्धार केला. आज त्याच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती जगभरात साजरी होत आहे. त्यांच्या कार्याचा अफाट महासागर आहे तो शब्दात वर्णन करता येत नाही. त्यामुळे जवळखेड येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकासाठी जो विकास निधी लागेल तो राज्य शासनाच्या माध्यमातून मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे यावेळी डॉक्टर शशिकांत खेडेकर यांनी सांगितले. यावेळी डॉक्टर सुनील कायंदे, डॉक्टर रामप्रसाद शेळके, गंगाधर जाधव, दीपक बोरकर, योगेश जाधव यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील मतकर Sunil Matkar यांनी तर प्रास्ताविक विजय गाटोळे तर आभार प्रदर्शन अक्षय गाटोळे यांनी केले.