जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मेहकर तहसील कार्यालयात निदर्शने

शेतकर्‍याला नुकसानीची भरपाई मिळावी व दुष्काळ जाहीर करावा

 

          www.buldhananews.com      बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने दिलेल्या निर्देशानुसार बुधवार, दिनांक 18 ऑक्टोंबर रोजी मेहकर तहसील कार्यालयात निदर्शने करून तहसिलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.


               दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, बुलढाणा जिल्ह्यामध्ये सोयाबीन हे घाटावर असलेले प्रमुख पीक आहे. यावर्षी कमी पावसामुळे व येलो म्योझॉक या रोगामुळे सोयाबीनचे उत्पन्नामध्ये खूप घट झाली आहे. तर काही ठिकाणी अत्यंत अल्प असे उत्पन्न झाले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी लागवडीसाठी लावलेला पैसा सुद्धा वसूल झाला नाही. या आर्थिक संकटामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. तरी सध्याच्या सरकारकडून शेतकर्‍याला नुकसानीची भरपाई मिळावी व दुष्काळ जाहीर करावा. यासाठी निदर्शने करून निवेदन देण्यात आले.

        तसेच महाराष्ट्र शासनाने अलीकडच्या काळामध्ये सर्वसामान्य जनतेशी निगडित असे दोन निर्णय घेतलेले आहे. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा बंद करून त्या शाळा खाजगी धनाढ्य व्यक्तींच्या संस्थेला देण्याच्या निर्णय घेण्यात आलेला आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागामध्ये शिक्षण घेणारे गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी, दिन दलितांच्या व अल्पसंख्यांकाच्या मुलांना शिक्षण घेणे कठीण जाणार असून या नवीन शाळेचा शिक्षणाचा खर्च ते उचलू शकणार नाही.
                       तेव्हा पर्यायाने ग्रामीण भागातील मुले शिक्षणापासून वंचित राहतील. तसेच राज्यस्तरावर दुसरा निर्णय शासनाच्या नोकर्‍या देण्याबाबत आहे. सदर नोकर्‍या कंत्राटी पद्धतीने देण्यात येत असून त्यामुळे बेरोजगार असलेल्या तरुणांची फार मोठी हानी होणार आहे. त्यांना सुद्धा सलग नोकरीच्या दृष्टीने दूर ठेवण्याचा प्रयत्न या निर्णयामुळे होणार आहे. तेव्हा हे दोन्ही आत्मघातकी निर्णय व सर्वसामान्य जनतेच्या जीवनमानाशी खेळणारे निर्णय असल्याने ते त्वरित रद्द करावे, यासाठी सुद्धा तहसीलदार यांच्या मार्फत मा मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदन पाठविण्यात आले आहे.
      या निदर्शनावेळी श्याम उमाळकर, लक्ष्मण घुमरे, अ‍ॅड.अनंतराव वानखेडे, राम डहाके, समन्वयक दिगंबर मवाळ, देवानंद पवार, चित्रागण खंडारे, नाजीमभाई कुरेशी, वसंतराव देशमुख, विलासराव चणखोरे, विनायकराव टाले, पंकज हजारी, प्रदीप देशमुख, शैलेश बावस्कर, कैलास सुखदाने, अनिल देशमुख, यूनुस पटेल, भूषण काळे, अशोक इंगळे सतीश ताजने, रवी सावजी, संजय मस्के, संजय वानखेडे, राजेश अंभोरे, डॉ.शेषराव बदर, अ‍ॅड.पाखरे , नारायण खोडवे, दिलीप आखरें , विनोद गोरे , आशुतोष तेलंग, श्रीधरराव लहाने, राजाभाऊ गायकवाड, शेरुभाई कुरेशी, सुखदेव ढाकरके, नारायण इंगळे, छोटू गवळी, रियाज कुरेशी, संदीप ढोरे, नितीन तुपे, तुकाराम चव्हाण इत्यादी पदाधिकार्‍यांनी सहभाग घेतला होता.

शेतकरी बांधवांनो तुम्हाला शेतमाल तारण कर्ज योजना माहिती आहे का?

राजमाता नावाने एक जिल्हा, एक ब्रँड ची घोषणा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें